सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

दहावी बारावी नंतर काय ?

दहावी बारावी नंतर काय...??
        
             दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झाले, पण... आता टेन्शन आणि कन्फ्युजन संपलं असं नाही. तर ते जास्त वाढलं आहे.
             दहावी-बारावी तर झाली, पण आता पुढे काय? कोणती साईड निवडायची ? नेमकं काय करायचं ? या अशा अनेक प्रश्नांनी विद्यार्थी गोंधळून गेले आहेत.    
              दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच पैकी एक पर्याय निवडावा लागेल. सायन्स,कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा किंवा आय.टी.आय. काही विद्यार्थ्यांचे ठरले असेल, पुढे आपल्याला काय करायचे आहे.त्यानुसार ते एक पर्याय निवडतील. पण, बरेच विद्यार्थी असे आहेत की, त्यांना समजत नाहीये काय करावं ? यापैकी एक पर्याय निवडला म्हणजे झालं,असे तर होत नाही ना. आपल्याला कशामध्ये आवड आहे हे समजायला हवं. काही विद्यार्थी पालकांच्या सांगण्यावरून किंवा इतरांच्या सांगण्यावरून सायन्स निवडतात, पण ते त्या विद्यार्थ्याला जमत नसेल , तर त्यांचा धीर खचून जाईल. त्याला जे जमत होतं ते सुद्धा परत करता येणार नाही. मला असं म्हणायचं नाही की पालकांच किंवा इतरांचा ऐकू नये. ते चुकीचे असतात असं तर अजिबात नाही . आपल्याला जमेल आपल्याला आवडेल त्या साईडलाच आपण ऍडमिशन घ्याव. म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा आपला निर्णय चुकणार नाही. हे झालं दहावीच्या विद्यार्थ्यांच.
                आता , विषय येतो तो बारावीच्या विद्यार्थ्यांचा. मला खात्री आहे, प्रत्येक विद्यार्थी आता हाच विचार करत असेल की पुढे काय करायचं ? कोणत्या साइडला ॲडमिशन घ्यायचं इंजीनियरिंग का मेडिकल, डिप्लोमा, फार्मसी की आणखी दुसरे काही नेमकं करायचं तरी काय..?
            काही विद्यार्थ्यांचा निश्चय पक्का असेल. मी हेच करणार , यालाच ऍडमिशन घेणार. त्यांनी ऍडमिशन प्रोसेस सुद्धा सुरू केली असेल. पण लाखो विद्यार्थी असे असतील की, त्यांना काय करावं सुचत नसेल. त्यामुळे बरेच विद्यार्थी डिप्रेशन मध्ये सुद्धा गेले असतील. अशावेळी  मोठ्यांचा आधार आणि स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचं असतं.
             बारावी पर्यंत आलो ते पण घरच्यांनी सांगितलं म्हणून या साइडला घेतलं. मग आता पुढे काय करू काय कळत नाहीये.काहींनी तर आपला मित्र किंवा मैत्रीण सायन्सला जातो , म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलं असेल. पण त्यांना आता असं वाटत असेल मला सायन्स नको होतं , मी कॉमर्सला जायला हव होतं किंवा डिप्लोमा करायला हवा होता. पण आता वेळ निघून गेली आहे. विद्यार्थी स्वतःला दोष देत असतील. आता तसे न करता पूढचा मार्ग कसा निवडता येईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.
               बारावी नंतर खूप काही करता येतं खूप कोर्सेस अवेलेबल आहेत. ज्यांनी ठरलं असेल त्यांना आता काहीच अडचण नाहीये ते त्यांचे ध्येय गाठण्यासाठी तयार आहेत. खूप विद्यार्थ्यांना कळत नाहीये काय करावं.त्यात आता बारावी झाल्यानंतर मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे.... जिथे जाईल तिथे सगळे हेच विचारतात, मग आता पुढे काय करणार आहेस..? काहीजण ठरलेले नाही बघू आता पुढे असे म्हणतात, ठरवलं असेल ते सांगतात.
पुढे काय करणार असे विचारून झालं की, परत तू हे कर, याला ऍडमिशन घे,हे चांगले आहे, असंच कर असे जवळजवळ सगळेच सांगतात. अर्थात ते अनुभवी असतात म्हणून सांगतात.
            काय होतं आपलं ठरलेलं असतं काय करायचं आहे, पण मध्येच कोणीतरी सांगतं हे चांगलं नाही,स्कोप नाही दुसरं काही तर कर. मग काय पुन्हा टेन्शन येतं... खरंच मी ठरवलेलं आहे ते बरोबर आहे की, नाही असा प्रश्‍न पुन्हा मनाला सतावतो.
                  मला वाटतं मोठ्या लोकांची ॲडव्हाइस घ्यायचीच, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही कोणत्या फिल्ड मध्ये काय आहे वगैरे....
त्यानंतर आपल्याला काय जमतं ,आपली आवड काय आहे, हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं. कन्फ्युजन होईल,पण स्वतःला काय जमतं, काय आवडतं.हे न कळण्याइतकं आपण आता लहान नाहीये. या वयामध्ये स्वतःला समजून घेणं स्वतः सावरनं खूप गरजेचं आहे. हीच तर खरी सुरुवात आहे. काहीतरी करण्याची जिद्द प्रत्येकामध्ये असते. फक्त ती ओळखता येत नाही. ज्याला ते जमेल, तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होईल. स्वतःपेक्षा जास्त स्वतःला कोणीच ओळखू शकत नाही. आपण जो निर्णय घेऊ तो विचार करून काळजीपूर्वक घ्यायला हवा.
               दहावी-बारावीनंतर काय करायचं हे जर स्वतःला समजलं तर नक्कीच आपण आपले ध्येय प्राप्त करू...!

1 टिप्पणी:

दहावी बारावी नंतर काय ?

दहावी बारावी नंतर काय...??                       दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागला, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले, सगळे खूष ही झ...